रणसंग्राम २०२४: बारामतीत इंडिया आघाडीच जिंकणार: शरद पवार

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तयारीसाठी शरद पवार यांनी निसर्ग मंगल कार्यालय मार्केट यार्ड येथे मॅरेथॉन सभा घेतल्या. पवार यांनी बारामती, दौंड, पुरंदर, भोर-वेल्हा-मुळशी, खडकवासला, हवेली कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

संग्रहित छायाचित्र

पवार यांनी बारामती, दौंड, पुरंदर, भोर-वेल्हा-मुळशी, खडकवासला, हवेली कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी केली चर्चा

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तयारीसाठी शरद पवार यांनी निसर्ग मंगल कार्यालय मार्केट यार्ड येथे मॅरेथॉन सभा घेतल्या. पवार यांनी बारामती, दौंड, पुरंदर, भोर-वेल्हा-मुळशी, खडकवासला, हवेली कार्यकर्ते व  पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, ‘‘जरांगे आणि माझा संबंध जोडण्याबाबतची मुख्यमंत्री आणि उपमंत्र्यांची वक्तव्ये आणि वागणूक बालिश आणि बेजबाबदार आहे. आमचा कोणताही संबंध नाही, याप्रकरणात आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहोत.’’

शरद पवार म्हणाले, ‘‘यंदाच्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या वतीने आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा, आणि महाराष्ट्र काँग्रेसचे नेते कार्यकर्ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. आम्ही बारामती जिंकू यात काही अडचण नाही. परंतु आजच्या बैठकीत आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विरोधी पक्ष आणि नोकरशाहीकडून धमक्या आल्याच्या काही तक्रारी आहेत. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.’’

सुनेत्रा पवार यांची उमेदवारी आणि अजित पवार यांच्या खुल्या पत्रावर पवारांनी थोडक्यात उत्तर दिले. ‘‘लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार असतो. निवडणूक लढवण्याचा घटनात्मक अधिकार सर्वांना आहे. कुठल्याही पत्रावर मी अधिक भाष्य करणार नाही,’’ असे ते म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest