IPL : अर्शदीपच्या गोलंदाजीमुळे आमचा पराभव : रोहित

सलग तीन विजयानंतर मुंबई इंडियन्सला होमग्राऊंडवर पराभवाला सामोरे जावे लागले. ‘‘मैदानावर आम्ही काही चुकीचे निर्णय घेतले, त्याचबरोबर अर्शदीपच्या गोलंदाजीमुळे आम्हाला सामना गमवावा लागला,’’ अशी प्रतिक्रिया मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यानंतर दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 24 Apr 2023
  • 03:56 pm
अर्शदीपच्या गोलंदाजीमुळे आमचा पराभव : रोहित

अर्शदीपच्या गोलंदाजीमुळे आमचा पराभव : रोहित

#मुंबई

सलग तीन विजयानंतर मुंबई इंडियन्सला होमग्राऊंडवर पराभवाला सामोरे जावे लागले. ‘‘मैदानावर आम्ही काही चुकीचे निर्णय घेतले, त्याचबरोबर अर्शदीपच्या गोलंदाजीमुळे आम्हाला सामना गमवावा लागला,’’ अशी प्रतिक्रिया मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यानंतर दिली.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात पंजाबने मुंबईचा १३ धावांनी पराभव केला. २१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा डाव चांगल्या सुरुवातीनंतरही ६ बाद २०१ धावांवर थांबला. सूर्यकुमार यादव (५७) आणि कॅमरून ग्रीन (६७) बाद झाल्यावर मुंबईचे इतर फलंदाज विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. या पराभवामुळे रोहित शर्माने निराशा व्यक्त केली.

अर्शदीपने शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केली. मुंबईला या षटकात विजयासाठी १६ धावा करण्याचे आव्हान असताना त्याने केवळ २ धावा देत २ बळी घेतले आणि मुंबईचा विजय हिरावला. विशेष म्हणजे, तिलक वर्मा (३) आणि निहाल वढेरा (०) यांना लागोपाठच्या चेंडूवर क्लीन बोल्ड करीत त्याने दोन्ही वेळा मिडल स्टंप तोडले.

सामन्यानंतर रोहित म्हणाला, ‘‘आम्ही हा सामना जिंकलो असतो. सूर्या आणि ग्रीन या दोघांनीही चांगली फलंदाजी केली. त्यांनी शेवटपर्यंत विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अर्शदीपने चांगली गोलंदाजी करीत सामना फिरवला. त्याचबरोबर मैदानात आम्ही काही चुका केल्या. आयपीएल संपण्यासाठी बराच वेळ शिल्लक असून आम्हाला स्पर्धात्मक राहण्याची गरज आहे.’’ वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest