NCP Split: ‘वाजवा तुतारी, गाडा गद्दारी’

राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर सर्वाधिक गोंधळाची परिस्थिती सध्या बारामतीमध्ये आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक पत्र लिहून आपण वेगळा होण्याचा निर्णय कोणत्या पार्श्वभूमीवर घेतला?

Ajit Pawar

संग्रहित छायाचित्र

अजित पवार यांच्या लेटर डिप्लोमसीला ‘बारामतीकरांची भूमिका’ पत्राने उत्तर

राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर सर्वाधिक गोंधळाची परिस्थिती सध्या बारामतीमध्ये आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक पत्र लिहून आपण वेगळा होण्याचा निर्णय कोणत्या पार्श्वभूमीवर घेतला? याचे विवेचन केले आहे.

अजितदादांच्या या लेटर डिप्लोमसीनंतर आता बारामतीमध्ये एक निनावी पत्र व्हायरल झाले आहे. ‘बारामतीकरांची भूमिका’ या नावाने हे पत्र व्हायरल झाले आहे. या पत्रात अनेक गोष्टींचा उल्लेख केला असून त्यामध्ये राजेंद्र पवारांची क्षमता असूनदेखील अजित पवारांना  राजकारणात पुढे संधी दिली, तसेच तिसऱ्या पिढीत राजकारणात येण्याचा अधिकार रोहित पवार यांना होता, ते राजकारणात आल्यानंतर जळफळाट सुरू झाल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आलेला आहे. त्यामुळेच सामान्य बारामतीकरांची हीच भूमिका आहे की, ‘वाजवा तुतारी, गाडा गद्दारी’

‘बारामतीकरांची भूमिका’ या नावाने व्हायरल झालेल्या पत्रात म्हटले आहे की, पवारांच्या घरात शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण होतं. शरद पवारांचा ओढा काँग्रेसकडे होता. याच पक्षात ते पुढे पुढे जात राहिले आणि आप्पासाहेबांनी शेतीकडे मोर्चा वळविला. पुढची पिढी जेव्हा तयार होत होती, तेव्हा स्व. अनंतरावांचा मुलगा अजित आणि आप्पासाहेबांचा मुलगा राजेंद्र यांच्यापैकी कोणाला राजकारणात संधी द्यावयाची याबाबत विचार सुरू झाला. त्यावेळी दोन्ही भावांनी अनंतरावांच्या मुलासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून राजेंद्र पवारांची क्षमता असूनदेखील अजित पवारांना पुढे केले. दोघांनीही त्यांना वेळोवेळी सांभाळूनही घेतले. त्यावेळी राजेंद्र पवारांनी बंड केलं नाही. पुढचा इतिहास सर्वांना माहितच आहे. तिसऱ्या पिढीत जेव्हा पार्थ की रोहित अशी निवड करायची  वेळ आली, तेव्हा आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहितची निवड करुन अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला. तिथपासून खरा जळफळाट सुरू झाला होता. सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशीवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या. त्यामुळेच सामान्य बारामतीकरांची हीच भूमिका आहे की, ‘वाजवा तुतारी, गाडा गद्दारी’.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story