मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदू; संभाजी भिडे यांचे सांगलीत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

सतत वादग्रस्त विधान करणारे संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केले आहे. मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्तान, असे वक्तव्य भिडेंनी केले आहे. सत्ताकारण आणि अर्थकारण शूद्र आहेत.

Sambhaji Bhide

मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदू; संभाजी भिडे यांचे सांगलीत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

सांगली : सतत वादग्रस्त विधान करणारे संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केले आहे. मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्तान, असे वक्तव्य भिडेंनी केले आहे.  सत्ताकारण आणि अर्थकारण शूद्र आहेत. ते थुंकण्याच्या लायकीचे विषय असल्याचे भिडे म्हणाले आहेत. देशातील उत्सवांवरही त्यांनी भाष्य केले आहे.

नवरात्रौत्सवानिमित्ताने सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना संभाजी भिडे  यांनी केलेल्या वक्तव्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

देशाच्या पाठीवर असंख्य अतिक्रमण झालेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्तान आहे. हिंदी-चिनी आणि हिंदी मुस्लीम भाई म्हणाऱ्या हिंदूंना शत्रू कोण, वैरी कोण, वाईट कोण, चांगले कोण हे कळत नाही. कारण हिंदू महामूर्ख आहे. गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे. नवरात्र उत्सवाचा दांडिया हिंदू समाजाला भ्याड बनवत चालला आहे. नवरात्राचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही, असेही संभाजी भिडे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर राजकारण, अर्थकारण शूद्र आहे. हे थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या रक्ताचा समाज निर्माण करण्याची गरज आहे, शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप व्हायचा मार्ग शिकवला, पण गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे.  नवरात्र उत्सवात दांडिया हिंदू समाजाला चुकीचे वळण देत  चालला आहे. हे सर्व चालणार नाही, नवरात्रीचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही. काही माता-भगिनींनी यापुढे स्वतंत्र दुर्गामाता दौड काढावी. आम्ही नवरात्रीचा बट्ट्याबोळ हाणून पाडू. दुर्गामाता दौडीमध्ये असणाऱ्या पोलिसांनीही टोप्या घालून आपल्या सोबत दौडीत पळाले पाहिजे, असेही भिडे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. हिंदूंचा अपमान करण्याचा अधिकार व्यक्तीला नाही अशी टीका करत संभाजी भिडे यांच्यावर काय कारवाई करणार, असा सावल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालणारे असल्याचा आरोपही संभाजी भिडे यांनी केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest