नाना पेठेतील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू, वादात नेमकं काय घडलं?
मोनिका येनपूरे
पुण्यातील नाना पेठेत सोमवारी दुपारी चारच्या सुमारास दोन टोळीमध्ये मोठे वाद झाले होते. यामध्ये जखमी झालेल्या निखिल आखाडे याचा जहांगीर हॉस्पिटल येथे मंगळवारी मृत्यू झाला आहे. याच हल्ल्यात आणखी एक जखमी झाला होता. त्याचे नाव अनिकेत दहीभाते असे आहे. अनिकेत वर सध्या पुण्यातील भारती विद्यापीठ येथे उपचार सुरू आहेत. या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी नेमकं काय घडलं हे अनिकेतने यामध्ये सांगितले आहे.
'मी आणि माझा मित्र निखिल आखाडे आम्ही दोघे माझ्या मानलेला बहिणीकडे गेलो होतो. यावेळी आमच्या दोघांवर प्राण घातक हल्ला झाला. हा हल्ला आंबेकर टोळीतील मुलांनी केलेला आहे. हल्ला करण्याचे मूळ कारण असे की दोन महिन्यांपूर्वी आमची शाब्दिक चकमक झाली होती आणि त्यावेळी त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती.
दोन महिन्यानंतर आम्ही आमच्या बहिणीकडे गेल्यानंतर त्यांनी हा राग बाहेर काढला. दहा ते बारा जण वेगवेगळी आत्या घेऊन आमच्यावर हल्ला करत होते. या हल्ल्यामध्ये माझा मित्र दगावला आहे. महाराष्ट्र सरकारने या आंबेकर टोळीतील सर्वांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करत आहे' असे अनिकेत दूधभाते यांनी सांगितले आहे.