रोगापेक्षा इलाज भयंकर...
पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील गटारांची साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, साफसफाई करताना गटारातील गाळ रस्त्यावरच टाकला जात आहे. बराच वेळ तो रस्त्यावरच पडून राहिल्याचे दिसते. यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत असून, डासांची उत्पती वाढण्याचीही शक्यता आहे. गाळावरून वाहने घसरण्याचाही धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांवर रोगापेक्षा इलाज भयंकर असे म्हणण्याची वेळ आली आहे.