चोरीला गेलेले ९ लाखांचे मोबाईल नागरिकांना केले परत, शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी

पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील नागरिकांचे ९ लाख ५० हजार रुपयांचे ५१ मोबाईल चोरीला गेले होते. मात्र, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने या प्रकरणाचा छडा लावत ५१ मोबाईल नागरिकांना परत केले आहेत. याबद्दल नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 24 Apr 2023
  • 05:25 pm

चोरीला गेलेले ९ लाखांचे मोबाईल नागरिकांना केले परत

विविध राज्यातून ५१ मोबाईल फोन केले हस्तगत

पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील नागरिकांचे ९ लाख ५० हजार रुपयांचे ५१ मोबाईल चोरीला गेले होते. मात्र, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने या प्रकरणाचा छडा लावत ५१ मोबाईल नागरिकांना परत केले आहेत. याबद्दल नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या सायबर पथकाने सर्व मुद्देमाल वेगवेगळ्या राज्यातून हस्तगत केला आहे. यामध्ये उत्तर भारत, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, पंजाब व महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. यासाठी पोलिसांनी चोरीला गेलेल्या मोबाईलचा डेटा तयार केला होता.

त्यानंतर पोलिसांनी त्यांना येत असलेल्या वेगवेगळ्या भाषांचा वापर करत अत्यंत कौशल्याने हे फोन शोधून काढले. यात विविध महागड्या कंपन्याचे ९ लाख ५० हजार रुपयांचे ५१ फोन होते. पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांनी कौतुक केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story