बंद वाहनावर टेम्पो धडकला; नऊ वारकरी जखमी
महामार्गावर बंद पडलेल्या वाहनाला पाठीमागून टेम्पोने धडक दिली. यामध्ये नऊ वारकरी जखमी झाले. ही घटना गुरुवारी (१८ जुलै) रात्री दहाच्या सुमारास ताथवडे येथे घडली. याप्रकरणी टेम्पो चालक मिलिंद मिटाराम पाटील (वय ४६, रा. मानेरे, अंबरनाथ, जि. ठाणे) यांनी शुक्रवारी (१९ जुलै) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी रजब शेख (वय २६, रा. वडगाव, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिलिंद पाटील हे वारकऱ्यांना वारकऱ्यांना घेऊन पंढरपूर येथून अंबरनाथ येथे चालले होते. त्यावेळी आरोपी रजब याने त्याने त्याचे बंद पडलेले वाहन मधल्या लेनवर उभे केले. तसेच बंद पडलेल्या वाहनाच्या मागे रिफलेक्टर, पार्किंग लाइट लावली नाही.
अपघात होऊ शकतो हे माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केले. टेम्पोचालक मिलिंद पाटील यांना ते वाहन न दिल्यामुळे त्यांचा टेम्पो बंद पडलेल्या वाहनावर जाऊन धडकला. यामुळे नऊ वारकरी जखमी झाले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.