चिरेतून चिरंतनाकडे
आपलं अस्तित्त्व टिकवण्यासाठी कडे-कपारीतही उमलणाऱ्या रोपट्याचा पुढे कालांतराने महाकाय वृक्ष होतो. पण या महाकाय वृक्षालाही प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते, शक्य तेवढ्या जागेत, शक्य तेवढा प्राणवायू घेत, पाण्याच्या एका थेंबांवरही जगण्याची उमेद जागवावी लागते, तरच ही वेल वाढते, फोफावते.