असून अडचण नसून खोळंबा
वाघोली ते संगमवाडी दरम्यान बीआरटी मार्ग सुरु करण्यात आला होता. मात्र आता या मार्गाची अवस्था बिकट झाली आहे. कारण या मार्गावरील बस मुख्य मार्गावरून जातात. काही ठिकाणी बीआरटी थांब्यांवर भिकाऱ्यांनी आपले संसार थाटले आहेत. तर काही थांबे तळीरामांना आपलेसे केले आहेत. या मार्गावर काही ठिकाणी लहान मुले क्रिकेटही खेळत असतात.