पुणे: वाहून गेलेला मुलगा न सापडल्याने नागरिकांकडून पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन

पुण्यातील कात्रज परिसरातील लेकटाऊन सोसायटीजवळ असलेल्या आंबील ओढ्यात मासे पकडण्यासाठी गेलेला तरुण वाहून गेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 27 Jul 2024
  • 11:37 am

संग्रहित छायाचित्र

पुण्यातील कात्रज परिसरातील लेकटाऊन सोसायटीजवळ असलेल्या आंबील ओढ्यात मासे पकडण्यासाठी गेलेला तरुण वाहून गेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली होती. अक्षय संदेश साळुंके (वय २६, सध्या रा.  इंदिरानगर, मूळ रा. सांगली) असे वाहून झाले गेलेल्याचे नाव आहे.  

पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. गेल्या तीन दिवसांपासून शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातील विविध भागात पावसाचे पाणी साचले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तरुणाचा शोध घेतला मात्र अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली. 

चोवीस तास उलटून गेल्यानंतरही मुलाचा तपास न लागल्याने आता परिसरातील नागरिकांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे आंदोलनातला सुरुवात केली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest