संग्रहित छायाचित्र
वडीलांनी इंद्रायणी नदीतच्या काठावर सोडलेल्या एका अकरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ८ जून रोजी दुपारी पुण्यातील आळंदी येथील माऊली मंदिर येथील इंद्रायणी नदीत घडली आहे. या प्रकरणी मुलाच्या वडीलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनायक धोंडीराम इप्पर (वय ३१, रा. भूगाव, मुळशी) असे गुन्हा दाखल झालेल्या वडीलाचे नाव आहे. या प्रकरणी मृत मुलाच्या आईने आंळदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आईने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुलाला पोहता येत नाही हे वडिलांना माहित होते. मात्र, तरी देखील वडिलांनी मुलाला इंद्रायणी नदीच्या परिसरात नेले.
त्यानंतर मुलाचा तिथेच सोडून वडील नदीच्या पलीकडे गेले. या दरम्यान, मुलाचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे मुलाच्या मृत्यूस वडील जबाबदार असल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.