PCMC : अखेर प्राधिकरणातील बंगला मालकावर गुन्हा दाखल, 'सीविक मिरर'च्या वृत्तानंतर उद्यान विभागाला आली जाग

सणासुदीच्या काळात झाडांवरील सजावटीच्या दिव्यांनी झाडांचे नुकसान कसे होते आणि अशा झाडांचा आसरा घेणारे पक्षी, प्राणी आणि कीटकांवर विपरीत परिणाम होतो, या संदर्भात 'झाडांवर रोषणाई, पक्ष्यांचा जीव जाई...' या शीर्षकाखाली 'सीविक मिरर' ने या समस्येबाबत वाचा फोडली होती.

PCMC : अखेर प्राधिकरणातील बंगला मालकावर गुन्हा दाखल, 'सीविक मिरर'च्या वृत्तानंतर उद्यान विभागाला आली जाग

अखेर प्राधिकरणातील बंगला मालकावर गुन्हा दाखल, 'सीविक मिरर'च्या वृत्तानंतर उद्यान विभागाला आली जाग

परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी सजवली झाडे, पर्यावरणाची हानी

सणासुदीच्या काळात झाडांवरील सजावटीच्या दिव्यांनी झाडांचे नुकसान कसे होते आणि अशा झाडांचा आसरा घेणारे पक्षी, प्राणी आणि कीटकांवर विपरीत परिणाम होतो, या संदर्भात 'झाडांवर रोषणाई, पक्ष्यांचा जीव जाई...' या शीर्षकाखाली 'सीविक मिरर' ने या समस्येबाबत वाचा फोडली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने प्रथमच कारवाईचे हत्यार उचलले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाने आकुर्डी प्राधिकरण परिसरातील एका बंगला मालकावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

अधिकृत परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी झाडे सजवल्याबद्दल आणि पर्यावरणाला हानी पोहोचवल्याबद्दल अधिकाऱ्यांनी नोंदवलेला हा अशाप्रकारचा  पहिलाच गुन्हा आहे.  उद्यान विभागाने निगडीतील प्राधिकरण येथील ब्रिजभवन बंगल्यात राहणारे संजय तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने  मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक एलईडी वापरून त्यांच्या बंगल्याच्या आजूबाजूची झाडे प्रकाशित केल्याचा आरोप आहे आणि त्याने कोणतीही परवानगी घेतली नव्हती. ही झाडे महापालिकेच्या मालकीच्या रस्त्यावर आणि फूटपाथवर होती.

महाराष्ट्र (शहरी क्षेत्र) वृक्षांचे संरक्षण आणि जतन अधिनियम, १९७५ चे कलम २१महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरणविरोधी कायदा, १९९५ चे  कलम ३ आणि पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ च्या कलम १५ अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. सणासुदीच्या काळात झाडांवर सजावटीचे दिवे लावण्याच्या प्रथेवर पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. झाडांचे नुकसान तर होतेच पण पक्षी, प्राणी आणि कीटकांवरही विपरीत परिणाम होतो, असेही त्यांचे म्हणणे होते.

दिवाळीच्या काळात बंगले, घरे, सरकारी कार्यालये आणि व्यापारी संकुलांच्या आजूबाजूची झाडे रंगीबेरंगी, आकर्षक आणि नाचणाऱ्या विद्युत सजावटीच्या दिव्यांनी उजळून निघतात, पक्षी, प्राणी, त्यात आश्रय घेणारे कीटक आणि झाडे यांना धोका असल्याचे पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.

पर्यावरणवाद्यांच्या मते, फांद्यांवर सजावटीचे दिवे लटकवल्याने किंवा खोडाभोवती बांधल्याने झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.  झाडांचे कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे होते. रात्रीच्या वेळी झाडांवर आसरा घेणा-या  पक्ष्यांना  जास्त प्रकाशामुळे  इजा होत असल्याचा दावाही कार्यकर्त्यांनी केला होता. काही रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांच्या मालकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जवळपासच्या झाडांवर रोषणाई केली आहे, परंतु कृत्रिम दिवे झाडांच्या जीवनचक्रावर आणि त्यांच्याशी संबंधित प्राणी आणि पक्ष्यांना प्रभावित करतात. तसेच कार्यक्षम प्रकाशसंश्लेषणासाठी झाडे आणि वनस्पतींना अंधार आवश्यक आहे; तथापि, कृत्रिम दिवे प्रक्रियेत अडथळा आणतात आणि शेवटी वनस्पतींच्या पुनरुत्पादक प्रणालीवर परिणाम करतात, असा दावाही पर्यावरणवाद्यांंनी केला होता.

वृक्षप्रेमी आणि प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, “दिवाळीसारखे सण साजरे करताना सामाजिक भान राखणे गरजेचे आहे. काही अतिउत्साही रेस्टॉरंट आणि दुकान मालक, बंगले मालक झाडांवर विद्युत दिवे लावताना पर्यावरणाच्या नियमांचे पूर्णपणे उल्लंघन करतात. सध्या कृत्रिम दिव्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई होत नाही, पण ही कारवाई पाहून झाडांभोवती कृत्रिम दिवे लावण्यापासून इतरांना नक्कीच प्रतिबंध होईल."

आम्ही काही दोषी लोकांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यांना कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. मात्र ते रोषणाईचे  दिवे काढण्यात त्यांनी टाळाटाळ केली, त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. अशा गुन्हेगारांवर कारवाई सुरूच ठेवली जाईल, असे ते म्हणाले.

- राजेश वसावे, साहाय्यक उद्यान अधीक्षक, पिंपरी -चिंचवड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest