मरणासन्न!
संपूर्ण देशाचे नियंत्रण ज्या ऐतिहासिक शनिवारवाड्यातून होत होते त्या वाड्याला १८२८ मध्ये लागलेल्या भयंकर आगीत सगळे सात मजले खाक झाले. वाचलेली एकमेव बाब म्हणजे १७३२ मध्ये प्रवेशद्वाराच्या भिंतीवर साकारलेली 'मराठा चित्रशैली'तील गणेश आणि गरूड चित्रे. पहिल्या बाजीराव पेशवे यांनी राजस्थानमधील कलाकारांना चित्र काढण्यासाठी आमंत्रित केले होते. जोडलेल्या रचनांच्या चित्रशैलीतील हे अखेरचे स्मारक आता मरणासन्न अवस्थेत आहे. तथाकथित राष्ट्रीय संरक्षित स्मारक असलेल्या वास्तूत आता संरक्षित काय उरले आहे, हाही एक प्रश्न आहे.
'सीविक मिरर'चे छायावृत्तकार महेंद्र कोल्हे यांनी 'शनिवारी' चित्रांची ही मरणासन्न अवस्था टिपली आहे .