‘ये जवानी है दिवानी-२’चे संकेत
ये जवानी है दिवानी या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वेल येत असल्याची चर्चा सुरू असून तसे संकेत रणबीर कपूरनेच दिले आहेत. रणबीरच्या संकेतामुळे त्याचे चाहते कमालीचे आनंदी झाले आहेत. ‘ये जवानी है दिवानी’ चा सिक्वेल यावा असे प्रेक्षकांनाही वाटत आहे. एका मुलाखतीत सिक्वेलच्या कथानकाबद्दल रणबीर म्हणाला की, ही कथा आता दहा वर्षे पुढे जाणार आहे. त्यामध्ये बनी (रणबीर), दीपिका (नैना), अवी (आदित्य) आणि आदिती (काल्की) असून त्यांचे आयुष्य आता दहा वर्षांनी पुढे गेलेले आहे.
‘ये जवानी है दिवानी’ चा सिक्वेल चांगला होईल असे मला मनापासून वाटत होते असे सांगून रणबीर म्हणतो की, अयानकडे अतिशय चांगले कथानक होते. मात्र, त्याने ब्रम्हास्त्रकडे लक्ष दिल्याने तो विषय थोडा मागे पडला. मात्र, त्याने सिक्वेलला कधी नकार दिलेला नव्हता. याला काही काळ लागेल, मात्र सिक्वेल येणार असे मला ठाम वाटते. आयुष्यात दहा वर्षे पुढे गेलेल्या बनी (रणबीर), दीपिका (नैना), अवी (आदित्य) आणि आदिती (काल्की) यांच्या आयुष्यात आता नेमके काय होणार आहे, हे जाणून घेणे इंटरेस्टिंग असेल हे नक्की.
२०१८ मध्येही रणबीरने सिक्वेलबाबत संकेत दिले होते. तो म्हणाला होता की, अयान कदाचित ब्रम्हास्त्र १ आणि २ च्या भागादरम्यान ‘ये जवानी है दिवानी’ चा सिक्वेल बनवेल. अयान सध्या ब्रम्हास्त्र १ च्या निर्मितीत मग्न आहे. त्याच्या निर्मितीला खूप वेळ लागणार आहे. दरम्यानच्या काळात आम्ही ‘ये जवानी है दिवानी’ च्या पुढील भागाबाबत बोललो होतो. त्यावेळी चर्चेदरम्यान सिक्वेल लवकर होईल असे आमचे मत होते. मात्र, ब्रम्हास्त्रबाबत अयान अधिक आग्रही असल्याने तो त्याच्या मागे लागला होता.
श्रद्धा कपूरबरोबरच्या तू झुठी मै मक्कार या चित्रपटात रणबीर कपूर अलीकडे दिसला होता. त्याचा पुढील चित्रपट ॲनिमल लवकरच भेटीला येत असून त्यात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना असणार आहे. त्याशिवाय अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही भूमिका आहेत. त्यानंतर ब्रम्हास्त्र २ च्या तयारीत रणबीर गुंतलेला असेल.