... म्हणून दिली होती काजोलने धमकी

झगमगत्या विश्वात कायम लिंकअप, ब्रेकअप, लग्न, घटस्फोट आणि एक्स्ट्रा अफेअरच्या चर्चा रंगलेल्या असतात. पण जेव्हा प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींबद्दल अशा काही चर्चा रंगतात तेव्हा सर्वत्र खळबळ माजते. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये देखील सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. आता देखील अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्या नात्याच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Thu, 13 Jun 2024
  • 03:18 pm

संग्रहित छायाचित्र

झगमगत्या विश्वात कायम लिंकअप, ब्रेकअप, लग्न, घटस्फोट आणि एक्स्ट्रा अफेअरच्या चर्चा रंगलेल्या असतात. पण जेव्हा प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींबद्दल अशा काही चर्चा रंगतात तेव्हा सर्वत्र खळबळ माजते. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये देखील सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. आता देखील अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्या नात्याच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. कंगना–अजय यांच्या नात्याची चर्चा अभिनेत्री काजोल हिच्यापर्यंत पोहोचल्यानंतर वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. सांगायचे झाले तर, अजय देवगन आणि काजोल यांची ओळख बॉलिवूडच्या पॉवर कपल अशी आहे. पण दोघांच्या नात्याला देखील एस्क्ट्रा अफेअरचा डाग लागला आहे. एक काळ असा होता जेव्हा अजय देवगण आणि कंगना रनौत यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अजय आणि कंगना यांच्या नात्याच्या चर्चांना सुरुवात झाली.

अजय आणि कंगना यांच्यामध्ये वाढत असलेली जवळीक काजोल हिला कळल्यानंतर अभिनेत्री भडकली. काजोलने अजयला धमकी देखील होती. ‘मुलांना घेऊन घर सोडून जाईल’ अशी धमकी अभिनेत्रीने पतीला दिली होती. अशी देखील चर्चा होती की, अजय याच्या दबावामुळे ‘तेज’ आणि ‘रास्कल्स’ सिनेमात कंगना हिला कास्ट करण्यात आले. तर निर्मात्यांना सिनेमात कंगना हिला कास्ट करायचे नव्हते.  पण काजोलपर्यंत अफेअरच्या चर्चा पोहोचल्यानंतर आणि अभिनेत्रीने दिलेल्या धमकीनंतर अजय याने कंगना हिच्यासोबत असलेले नाते संपवले. त्यानंतर कधीच दोघांनी एकत्र काम देखील केले नाही. पण आजही अनेक वेळी दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगतात. रंगणाऱ्या चर्चांवर खुद्द अजय याने देखील मौन सोडले होते. अजय म्हणाला होता, ‘मी असे म्हणत नाही की, एक्स्ट्रा अफेअर नसतात म्हणून. पण कोणाला एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल चुकीच्या चर्चा रंगतात. कोणाला माझे नाव दुसऱ्या कोणासोबत जोडण्याची परवानगी मी देत नाही. माझे माझ्या कामावर प्रेम आहे. माझे काम संपल्यानंतर मी घरी जातो.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story