A. R Rahman : 'एआय'मुळे रहमानला नव्या पिढीची काळजी

आर्टिफिशियल इंटेलिजेन्स म्हणजेच एआय हा शब्द सध्या खूपच चर्चेत आला आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अलीकडे भन्नाट प्रयोग केले जातात. म्हातारपणी आपण कसे दिसू? ते जगाचा शेवट होईल तेव्हा माणसाचे रूप कसे असेल, अशा सगळ्या प्रकारचे फोटो एआयच्या माध्यमातून बनवता येतात. परंतु हे तंत्रज्ञान आपल्या नव्या पिढीसाठी ‘शाप आहे की वरदान?’ यावर संगीतकार ए. आर. रेहमान यांनी चिंता व्यक्त करीत एक ट्वीट केले आहे. त्यांच्या अनेक चाहत्यांनी या ट्वीटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 10 May 2023
  • 03:25 am
'एआय'मुळे रहमानला नव्या पिढीची काळजी

'एआय'मुळे रहमानला नव्या पिढीची काळजी

आर्टिफिशियल इंटेलिजेन्स म्हणजेच एआय हा शब्द सध्या खूपच चर्चेत  आला आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अलीकडे भन्नाट प्रयोग केले जातात. म्हातारपणी आपण कसे दिसू? ते जगाचा शेवट होईल तेव्हा माणसाचे रूप कसे असेल, अशा सगळ्या प्रकारचे फोटो एआयच्या माध्यमातून बनवता येतात. परंतु हे तंत्रज्ञान आपल्या नव्या पिढीसाठी ‘शाप आहे की वरदान?’ यावर संगीतकार ए. आर. रेहमान यांनी चिंता व्यक्त करीत एक ट्वीट केले आहे. त्यांच्या अनेक चाहत्यांनी या ट्वीटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांनी एआयच्या वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटरवर ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ यांनी तयार केलेला व्हीडीओ शेअर केला आहे. या व्हीडीओमधून चिनी शाळांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर कशाप्रकारे केला जातो याची माहिती मिळते. मुलांच्या प्रगतीचा अहवाल एआयच्या माध्यमातून थेट शिक्षक आणि पालकांपर्यंत पोहोचवला जातो, यासाठी सगळी मुलं शाळेत गेल्यावर डोक्यावर हेडबॅण्ड परिधान करतात. एवढेच नाही तर मुलांवर सतत रोबोटिक तंत्रज्ञानाच्या आधारे लक्ष ठेवले जाते आणि हजेरीसुद्धा एआयचा वापर करून घेण्यात येते. तसेच मुलांच्या गणवेशामध्ये चीप लावल्यामुळे ही मुले दिवसभर कुठे-कुठे जातात यावरसुद्धा लक्ष ठेवले जाते.

ए. आर. रेहमान यांनी हा व्हीडीओ शेअर करीत, “मला नव्या पिढीची दया येते… हे नवे तंत्रज्ञान त्यांच्यासाठी ‘शाप आहे की वरदान?’ हे येणारा काळच सांगेल.” असे म्हटले आहे. त्याच्या या ट्वीटवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने म्हटले आहे, “हा व्हीडीओ बघून हॉरर चित्रपटाची आठवण येते,” तर दुसऱ्या एकाने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “निश्चितपणे हे तंत्रज्ञान समाजासाठी शाप आहे कारण, यामुळे लहान मुलांची विचार करण्याची क्षमता कमी होऊन, ही मुले मशीनवर जगत आहेत.”

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story