नाना पाटेकर खोटारडे!

नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या या वादावर अलीकडेच नाना पाटेकरांनी मौन सोडले होते. त्यांनी म्हटले होते की, तनुश्रीने केलेल्या आरोपांचा काहीच फरक पडत नाही. आता नाना पाटेकरांच्या या वक्तव्यावर तनुश्री दत्ताने पलटवार केला आहे. नानांवर पुन्हा एकदा तिने आरोप केले आहेत. तसेच, ते खोटे बोलताहेत, असा दावाही तिने केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Wed, 26 Jun 2024
  • 12:54 pm

संग्रहित छायाचित्र

नाना पाटेकर ( Nana Patekar) आणि तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या या वादावर अलीकडेच नाना पाटेकरांनी मौन सोडले होते. त्यांनी म्हटले होते की, तनुश्रीने केलेल्या आरोपांचा काहीच फरक पडत नाही. आता नाना पाटेकरांच्या या वक्तव्यावर तनुश्री दत्ताने पलटवार केला आहे. नानांवर पुन्हा एकदा तिने आरोप केले आहेत. तसेच, ते खोटे बोलताहेत, असा दावाही तिने केला आहे.

एका मुलाखतीत तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर कडाडून टीका केली आहे. तिने म्हटले आहे की, जेव्हा वाराणसीत एका मुलाला त्यांनी कानशिलात लगावल्याचा व्हीडीओ समोर आला होता. तेव्हापासून नाना किती खोटे बोलतात हे आता संपूर्ण जगाला कळले आहे. ते तेव्हा अनिल शर्माच्या चित्रपटासाठी चित्रीकरण करत होते. नानाने पहिले त्या मुलाला कानशिलात लगावली होती. मात्र, नंतर तो चित्रपटाचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले. जेव्हा पब्लिकने कानउघडणी केली तेव्हा ते लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र जेव्हा यू-टर्न घेण्यात आला तेव्हा त्यांनी माफी मागितली, असे तनुश्री दत्ता हिने म्हटले आहे. आता नाना घाबरले आहेत. इंडस्ट्रीमध्ये त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा बेस हादरला आहे. जे पण त्यांना सपोर्ट करत आहेत ते बँकरप्ट झाले आहेत किंवा मग त्यांना नानांनी साइडलाइन केले आहे. लोकांना आता कळेल नाना कसे लोकांचे मन बदलवतात व त्यांच्यामध्ये आग लावण्याची कामे  करतात. ते खोटे बोलण्यात तरबेज आहेत.

तनुश्री दत्ता हिने डिंपल कपाडिया आणि वाराणसीतील त्या मुलांचे उदाहरण देत म्हटले आहे की, सगळे तर खोटे बोलू शकत नाहीत. ठीक आहे एकवेळ मी बोलत असेन. पण डिंपल कपाडिया यांनीही म्हटले होते ते चांगले माणूस नाहीत. त्या वाराणसी बॉयनेही म्हटले होते त्यांनी खरेच कानशिलात लगावली होती. जर ते कानशिलात लगावत असतील किंवा दिग्दर्शकाला मारत असतील तर ते एखाद्या महिलेसोबत गैरव्यवहार करणे काही मोठी गोष्ट नाही, असे तिने तनुश्रीने म्हटले आहे.

एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी कित्येक वर्षांनंतर तनुश्रीच्या आरोपांवर उत्तर दिले आहे. मला माहिती होते असे काहीच झाले नाही. मला रागदेखील आला नाही. मला यामुळे काहीच फरक पडत नाही. काही झाले असते तर मी त्यावर भाष्य केले असते. अचानक कोणीतरी येते आणि म्हणते तुम्ही असे केले ?मी काय म्हणणार मी नाही केले? त्या व्यतिरिक्त काय म्हणू शकलो असतो, असे नाना पाटेकर यांनी म्हटले आहे.  २०१८ साली नाना पाटेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तिने आरोप केले होते की, चित्रपट 'हॉर्न ओके प्लीज' मध्ये एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नानाने आपत्तीजनक व्यवहार केले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story