Barkha-Indranil : बरखा-इंद्रनीलचा लवकरच घटस्फोट

गेल्या आठवड्यात टीव्हीच्या मनोरंजन विश्वात अनेक घडामोडी घडल्या. कपिल शर्माच्या शोमध्ये सपना परत आली तर खतरों के खिलाडी १३ मधील सहभागी सदस्यांची यादी पक्की झाली. लोकप्रिय अभिनेत्री बरखा सेनगुप्ता आणि इंद्रनील सेनगुप्ता हे सर्वाधिक लोकप्रिय प्रेमीयुगुल होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 1 May 2023
  • 01:47 pm
बरखा-इंद्रनीलचा लवकरच घटस्फोट

बरखा-इंद्रनीलचा लवकरच घटस्फोट

गेल्या आठवड्यात टीव्हीच्या मनोरंजन विश्वात अनेक घडामोडी घडल्या. कपिल शर्माच्या शोमध्ये सपना परत आली तर खतरों के खिलाडी १३ मधील सहभागी सदस्यांची यादी पक्की झाली. लोकप्रिय अभिनेत्री बरखा सेनगुप्ता आणि इंद्रनील सेनगुप्ता हे सर्वाधिक लोकप्रिय प्रेमीयुगुल होते. मात्र, काही वर्षांपूर्वी ते परस्परांपासून वेगळे झाले. प्यार के दो नाम, एक राधा, एक शाम चित्रपटातील अभिनेत्री बरखा सेनगुप्ताने इंद्रनीलबरोबरचा घटस्फोट लवकरच मार्गी लागेल असे जाहीर केले आहे. यामुळे दोघे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता संपली असून त्यांचे चाराचे दोन हात होणार हे नक्की झाले आहे.

कपिल शर्माच्या शोमध्ये सपनाच्या भूमिकेतून आपले स्थान पक्के करणारा कृष्णा अभिषेक परत आला आहे.  कपिल शर्माच्या कॉमेडी शो चे जगभर प्रेक्षक आणि चाहते असून यातील सपना बनून येणारा कृष्णा अभिषेक काही मतभेदांमुळे शो मधून बाहेर पडला होता. तो शोमध्ये परतणार की नाही या विषयी वेगवेगळ्या चर्चा झडत होत्या. मात्र, कपिल आणि कृष्णामधील मतभेद चर्चेनंतर संपल्यामुळे त्याचा शोमध्ये परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.    

धाडसी स्टंटवर आधारित असलेल्या खतरो के खिलाडीच्या १३ व्या भागाची तयारी सुरू असून यात सहभागी होणाऱ्या सदस्यांची यादी निश्चित झाली आहे. या यादीमध्ये शिव ठाकरे, अंजुम फाकी, रुही चतुर्वेदी, अंजली आनंद, न्यारा बॅनर्जी, अर्चना गौतम, अर्जित तनेजा, सौदोंस मौफकिर यांचा समावेश असून शिझान खान याचाही या यादीत समावेश होण्याची शक्यता आहे. बीग बॉस १६ चा विजेता असलेल्या एम सी स्टॅनशी आपले संबंध बिघडले असल्याचे अब्दुल रोझिकने जाहीर केले असून सध्या आपण त्याच्याशी बोलतही नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. स्टॅन समवेत अब्दुलने दुबईतील कार्यक्रमात भाग घेतला होता. दुसरी धक्कादायक बातमी म्हणजे बिग बॉसमधील सहभागी निशांत भाट आणि राकेश बापट यांचेही बिनसल्याचे दिसते. निशांतने याबाबत खुलासा करताना हल्ली आपण राकेशच्या संपर्कात नसल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले आहे. याबाबत तो म्हणतो की, काही वेळा आपली मैत्री ही विशिष्ट मर्यादेपर्यंतच असावी असे वाटते. आपण फार जवळ आलो की काही समस्या निर्माण होतात. वाद झाल्यानंतर मैत्रीला बदनाम करण्यापेक्षा खूप घट्ट मैत्री टाळावी असे मला वाटते.    

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story