संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी एक दिशानिर्देश प्रसिद्ध केले आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना सातत्याने बॉम्बच्या बनावट धमक्या येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने ही कडक पावले उचलली आहेत. कारवाई करण्यात आली आहे.
या धमक्यांमुळे देशाची आर्थिक सुरक्षाही अस्थिर होते, असे केंद्राने म्हटले आहे. यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था, विमानसेवा आणि हवाई प्रवाशांची सुरक्षितता मोठ्या प्रमाणावर बाधित होते.
२५ ऑक्टोबर रोजी नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू म्हणाले होते की, केंद्र सरकार बॉम्बच्या खोट्या धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करत आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. खोट्या धमक्या देणाऱ्यांना नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकले जाईल.
शनिवारीही ३३ इंडियन एअरलाइन्सना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. गेल्या १३ आठवड्यांत, ३०० हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. तपासात सर्वच चुकीच्या आढळून आल्या.
धमक्यांमुळे विमानसेवेवर वाईट परिणाम झाला आहे. विमान वाहतूक मंत्रालयाचे ६०० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. या धमक्यांमुळे इंडिगो अकरा तर एअर इंडिया आणि विस्ताराच्या अकरा उड्डाणे बाधित झालीत. या सर्व धमक्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या.