कौटुंबिक आयुष्यामध्ये करिअर मागे पडेल का? ऐश्वर्या म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन ही जोडी अनेकांच्याच आवडीची. बी टाऊनमधील प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक असणाऱ्या बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या तिच्या कलाजगतातील कारकिर्दीमुळेही कायमच चर्चेच असते. हीच ऐश्वर्या सध्या मात्र एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Admin
  • Tue, 27 Aug 2024
  • 03:04 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन ही जोडी अनेकांच्याच आवडीची. बी टाऊनमधील प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक असणाऱ्या बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या तिच्या कलाजगतातील कारकिर्दीमुळेही कायमच चर्चेच असते. हीच ऐश्वर्या सध्या मात्र एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमादरम्यान ऐश्वर्याला तिच्या करिअर आणि वैवाहिक जीवनाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ऐश्वर्याच्या लग्नाला काहीच वर्ष पार पडली होती. कौटुंबिक आयुष्यामध्ये करिअर मागे पडेल का? असा प्रश्न तिला त्यावेळी विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना ऐश्वर्यानंही आपण वैवाहिक जीवनाचा आनंद घेत असल्याचे सांगितले.  लग्न आणि कौटुंबिक जीवनापुढे करिअर मागे पडण्याचा प्रश्नच येत नाही असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली होती. २००७ मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्याची सुरुवात झाली. पुढे त्यांनी लग्न केले आणि त्यांनी एका मुलीला जन्म दिला. 

ऐश्वर्या हळुहळू तिच्या कौटुंबीक जीवनाला प्राधान्य देत ती काही प्रमाणात रुपेरी पडद्यापासून दुरावली. पण, 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटाच्या माध्यमातून ऐश्वर्याने पुन्हा एकदा दमदार कमबॅक करत सर्वांच्याच नजरा वळवल्या होत्या. ऐश्वर्या सध्या फार कमी चित्रपटांमध्ये झळकत असली तरीही विविध ब्रँड एंडॉर्समेंट आणि तत्सम कारणांनी ती फॅशन इंडस्ट्रीत कायमच चर्चेचा विषय ठरते असे म्हणायला हरकत नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story