संग्रहित छायाचित्र
बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता संजय दत्त याला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं आणि आजही करत आहे. पण संजय दत्त त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत राहिलाच, पण अभिनेता खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत राहिला. एका मुलाखतीत खुद्द संजूबाबाने सांगितले होते की, त्याने ३०० हून अधिक महिलांना डेट केलं आहे, तर संजूबाबाने तीन लग्न केली. संजूबाबाच्या पहिल्या पत्नीचे नाव रिचा शर्मा होते. दोघांना एक मुलगी त्रिशाला आहे. ती ३५ वर्षांची असून अमेरिकेत राहते. कर्करोगामुळे रिचा शर्माचे निधन झाले.
रिचाच्या निधनानंतर अभिनेत्याच्या आयुष्यात मॉडेल रिया पिल्लई हिची एन्ट्री झाली. दोघेही एकमेकांना ओळखत होते. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजयला तुरुंगात जावे लागले तेव्हा ते एकमेकांच्या अधिक जवळ आले. कारण संजूबाबाच्या कठीण काळातदेखील रिया हिने अभिनेत्याची साथ सोडली नाही. रिया ही हैदराबादचे संस्थानिक नरसिंगगीर धनराजगीर ज्ञानबहादूर यांची नात आहे. संजय दत्तला रियाचा स्वभाव प्रचंड आवडला आणि तो शाही घराण्याच्या लेकीच्या प्रेमात पडला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजयने १९९८ मध्ये लग्न केले, पण दोघांचे लग्न फार काळ टिकले नाही. संजूबाबाने सात सिनेमे साईन केले होते.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिनेता सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला. अशात लग्नानंतर देखील रिया एकटी पडली. आता संजूबाबाच्या आयुष्यात मान्यता हिची एन्ट्री झाली होती, तर रियानेही टेनिस खेळाडू लिएंडर पेस याला डेट करण्यास सुरुवात केली होती. अशात रिया आणि संजय यांचा घटस्फोट झाला. संजय दत्तने तिसरे लग्न मान्यता दत्त हिच्यासोबत केले. मान्यता आणि संजय यांच्यामध्ये जवळपास २१ वर्षांचे अंतर आहे. आज संजूबाबा त्याच्या तिसऱ्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. संजय दत्त आणि मान्यता दत्त यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.