सर्वाधिक अफेअर्स असणारा अभिनेता

अक्षय कुमार नेहमीच आपल्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा करताना दिसतो. आता नुकताच अक्षय कुमारने त्याच्या ब्रेकअपबद्दल खुलासा केला आहे. अक्षय कुमार म्हणाला की, मी माझ्या आयुष्यात दोन ते तीन वेळा ब्रेकअपचा त्रास सहन केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Thu, 20 Jun 2024
  • 04:19 pm
Entertainment news, akshay kumar

संग्रहित छायाचित्र

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने चित्रपटांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. अक्षय कुमारची सोशल मीडियावर देखील जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे अक्षय कुमार हा बॉलिवूडचा असा एकमेव अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अक्षय कुमार मोठ्या संपत्तीचा मालक आहे. अक्षय कुमार सोशल मीडियावरही सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो व्हीडीओ शेअर करतानाही कायमच दिसतो. हेच नाही तर आगामी चित्रपटाचे प्रमोशनही अक्षय कुमार सोशल मीडियाच्या माध्यमातून करतो.  

अक्षय कुमार नेहमीच आपल्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा करताना दिसतो. आता नुकताच अक्षय कुमारने त्याच्या ब्रेकअपबद्दल खुलासा केला आहे. अक्षय कुमार म्हणाला की, मी माझ्या आयुष्यात दोन ते तीन वेळा ब्रेकअपचा त्रास सहन केला आहे. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचे ब्रेकअप होते, त्यावेळी त्याच्या मनात प्रचंड असा राग असतो. माझे ज्यावेळी ब्रेकअप झाले, त्यावेळी मी सर्व राग व्यायामाच्या माध्यमातून काढत असतो.  ब्रेकअप झाले की, मी जास्तीत जास्त व्यायाम करण्यावर भर देत असे. अक्षय कुमार याचे लग्न २००१ मध्ये ट्विंकल खन्ना हिच्यासोबत झाले. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहेत. ट्विंकल खन्ना हिच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर अक्षय कुमार याने शिल्पा शेट्टी, रवीना टंडन आणि पूजा बत्राला डेट केले. मात्र, यांचे रिलेशन फार काळ टिकू शकले नाही. शेवटी ट्विंकल खन्ना हिच्यासोबत अक्षय कुमार याने लग्न केले. ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांच्या लग्नाला आता २३ वर्षे पूर्ण झाली आहेत. ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार आनंदात आयुष्य जगत आहेत.

अक्षय कुमार याच्यावर शिल्पा शेट्टी हिने अत्यंत गंभीर आरोप केले होते. अक्षय कुमार आपल्याला रिलेशनमध्ये असताना धोका देत असल्याचेही शिल्पाने  म्हटले होते. शिल्पा शेट्टी हिच्यासोबत रिलेशनमध्ये असताना तो इतर मुलीला डेट करत असल्याचा आरोप त्यावेळी शिल्पाने केला होता. त्यानंतर शिल्पाने  राज कुंद्रा याच्यासोबत लग्न केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story