Pune Crime News : पत्नीने पोटगी व मुलाचा ताबा मिळण्यासाठी केस केल्याने सासूवर जावयाचे चाकूने वार

पत्नीने पोटगी व मुलाचा ताबा मिळणेबाबत केलेली केस माघे घे असे सांगून पत्नीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पती चाकुने वार करत असताना तिला वाजण्याच्यासाठी मध्ये आलेल्या सासूच्या पोटात वार झाले असून जावयांस अटक करण्यात आली आहे.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

लोणी काळभोर : पत्नीने पोटगी व मुलाचा ताबा मिळणेबाबत केलेली केस माघे घे असे सांगून पत्नीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पती चाकुने वार करत असताना तिला वाचवण्याच्यासाठी मध्ये आलेल्या सासूच्या पोटात वार झाले असून जावयांस अटक करण्यात आली आहे. (Pune Crime News) 

याप्रकरणी रुपाली संग्राम शिंदे (Rupali Sangra Shinde) (वय २८, रा. सध्या  आदर्श कॉलनी नायगाव ता. हवेली, जि. पुणे. मुळ रा. शिंदे वस्ती रेल्वेलाईन जवळ मोंडनिंब ता. म्हाडा जि. सोलापुर) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून संग्राम बळवंत शिंदे (Sangram Shinde) (वय ३० रा. शिंदे वस्ती रेल्वेलाईन जवळ, मोंडनिंब ता. म्हाडा जि. सोलापुर) याला अटक करण्यात आली आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार सन २०१२ साली संग्राम व रूपाली यांचा विवाह झाला आहे.  विवाह झाला त्याचे एक वर्षानंतर पती संग्राम सतत दारु पिऊ लागला. पत्नी  दारु पिण्याचे कारण विचारले असता तो तिलाच मारहान करत होता. घरचे सासु सासरे देखील तिलाच त्रास देत होते. तीने कोणत्याही कार्यक्रमासाठी माहेरी  आईकडे जाऊ का? असे विचारले की, ते तिला मारहाण करत व तुला आईकडे जायचे असेल तर कायमचे जा असे म्हणत असत. सन २०२१ मध्ये तिने राखी पोर्णिमेला आईकडे जाऊ का असे विचारले असता पतीने तिला मारहाण करुन दोन्ही मुलांसह नायगाव (ता. हवेली) माहेरी आणून सोडले त्यादिवसापासुन ती माहेरीच राहत आहे. पती संग्राम हा अधुन मधुन सासरी येवुन पत्नीस शिवीगाळ करीत होता. एके दिवशी त्यांने सासरी  मुलीला जबरदस्ती त्याचे गावी घेवुन गेला. त्यानंतर रूपाली हिने मुलीस मागतले परंतु त्याने दिले नाही म्हणुन रूपाली हिने सन २०२१ मध्ये शिवाजीनगर कोर्टामध्ये पती संग्राम यांचेवर मला पोटगी व मुलीचा ताबा मिळणेबाबत केस दाखल केली.

बुधवार (१३ डिसेंबर) रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारांस संग्राम हा सासरी आला. त्यावेळी त्याचे हातात लाल रंगाची टिफिनची पिशवी होती. त्यावेळी घरी रूपालीचे आईवडील व भावजय होते. संग्राम तिला "तु माझ्यावर केस टाकलीस ती माघारी घेणार आहेस का नाही." असे विचारत तिला शिवीगाळी करु लागला. त्यावर तिने त्याला जे काही होईल ते कोर्टात होईल असे सांगितले. याचा त्याला राग आला व त्याने शिवीगाळ जे काय मिटवायचे ते आताच इथेच मिटवतो असे म्हणत त्याने आणलेल्या टिफिनच्या पिशवीतुन चाकु काढला व तुला जिवंत सोडणार असे म्हणत रूपालीचे अंगावर धावत येवुन मारण्याचा प्रयत्न करत असताना तिची आई अलका या मध्ये आल्या. त्याने आईला तुझ्यामुळेच सगळे होत आहे. तुच केस मिटवु देत नाही तुलाच खल्लास करतो असे म्हणत त्यांचे जवळील धाराधार चाकुने सासूच्या  पोटात त्याने २ ते ३ वेळा चाकुने वार केले. त्यावेळी रूपाली व भावजय दिपा यांनी संग्राम याला ओढवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी रूपालीवर वार केला. तो वार भावजय दिपा हिने हाताने आडवत चाकु पकडल्याने दिपाचे हाताचे उजवे हाताचे बोटांना जखम झाली आहे. पोलीसांनी संग्राम याला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके हे करत आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest