पुणे: नवीन विद्युत खांबांच्या नावाखाली महापालिकेच्या तिजोरीला ५ कोटींचा ''शॉक''

पुणे: शहरासह उपनगर भागातील रस्त्यावरील जूने आणि चांगले विद्युत खांब काढून त्याजागी महापालिकेच्या विद्युत विभागाकडून फायबर रिइन्फोर्स पॉलिमर (एफआरपी) हे "शॉक प्रूफ' खांब बसविण्यात येत आहे.

नवीन विद्युत खांबांच्या नावाखाली महापालिकेच्या तिजोरीला ५ कोटींचा ''शॉक''

जून चांगले विद्युत खांब काढून "शॉक प्रूफ' बसवण्याचे काम जोमात

पुणे: शहरासह उपनगर भागातील रस्त्यावरील जूने आणि चांगले विद्युत खांब काढून त्याजागी महापालिकेच्या विद्युत विभागाकडून फायबर रिइन्फोर्स पॉलिमर (एफआरपी) हे "शॉक प्रूफ' खांब बसविण्यात येत आहे. ही शुध्द फसवणूक असून "शॉक प्रूफ' खांबांच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी साफ करण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने केला आहे. तसेच चांगले खांब असताना ते का काढले जात आहेत, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

रस्त्यावर तसेच पदपथावर बसविलेल्या विद्युत खांबांना सहज आपण हात लावतो. किंवा त्याला टेकून थांबतोही. त्यावेळी विजेचा धक्का बसेल अशी कोणतही शंका मनात नसते. परंतु काही वेळा खांबामध्ये विद्यूत प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का बसल्याने व्यक्तीच्या जीवावार बेतण्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यामध्ये किंवा जिथे पाणी साठून राहते अशा ठिकाणी मोठा धोका होण्याची शक्यता असते. असे गृहीत धरुन तसेच शहरातील अनेक भागात शॉक लागून जीवावर बेतणाऱ्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शहरासह उपनगर भागात "शॉक प्रूफ" खांब बसविण्यात येत असून यासाठी ५ कोटी २८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे विद्युत विभागाने स्पष्ट केले आहे.

महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावात पहिल्या टप्प्यात एक हजार विद्युत खांब बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र आता २ हजारहून अधिक खांब बसविण्यात आल्याचे विद्युत विभागाने स्पष्ट केले आहे. म्हाळूंगे रस्ता, सूस या समाविष्ट गावांमध्ये पहिल्या टप्प्यात एक हजार विद्युत खांब बसविण्यात येतील असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोखंडी विद्युत खांबांमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आढळून येतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होणाऱ्या घटना घडल्या आहेत. अशा घटना घडू नयेत यासाठी महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना करण्याचे विचारात होते. त्यानुसार, नागरिकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्त्वाचे असणारे "एफआरपी' हे शॉक प्रूफ विद्युत खांब बसविण्याचा महापालिकेकचे माजी आयुक्त विक्रम कुमार यांनी निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी महापालिकेच्या विद्युत विभागाकडून केली जात आहे. एफआरपी विद्युत खांब "शॉक प्रूफ' असल्याने नागरिकांची सुरक्षितता वाढणार आहे. जुन्या विद्युत खांबांच्या तुलनेत "एफआरपी' खांब ५ ते १० टक्के स्वस्त आहेत.  विद्युत खांब मजबूत, पारदर्शी, कमी वजनामुळे वापरण्यास सोपे जाणार आहेत. लोखंडी खांबांना गंज लागण्याची शक्यता असते. मात्र "एफआरपी" खांबांना गंज लागत नसल्याने विद्युत खांब दीर्घकाळ टिकण्याची शाश्‍वती देण्यात आलेली आहे. चूकून जर शॉर्ट सर्किट होवून आग लागली तर अशा घटनांमध्ये खांब वितळत नाहीत. अशी खात्री "एफआरपी' खांबांविषयी प्रशासनाने दिली आहे.

संक्रांत सणामुळे मुले पतंग उडवतात. त्यावेली पतंगाचा दोरा विद्युत खांबांमध्ये अडकल्याने धोका निर्माण झाल्याचे प्रकार समोर आले होते. तसेच रस्त्यावर उभारण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये अनेकवेळा पाणी साठलेले असते. त्यात खांबांमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का बसल्याचे घटना घडतात. यात अनेकांना आपला जीव देखिल गमवावा लागला आहे. त्यामुळे आता असे प्रकार घडू नयेत यासाठी  "एफआरपी" खांब बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात उभारण्यात आलेले विद्युत खांब जीआयएस किंवा एमएस प्रकारचे आहेत. काही तांत्रिक त्रुटी राहिल्याने विजेचा धक्का बसण्याचा धोका असतो. असे प्रकार घडू नयेत यासाठी "एफआरपी' खांब बसविण्याचे आदेश मुख्य विभागाने सर्व अधिकारी व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. त्यानुसार, शहराच्या वेगवेगळ्या भागात "एफआरपी' विद्युत खांब बसविले जाणार आहेत. संबंधित खांबांचा दर्जा चांगला असल्याने तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या असलेल्या विद्युत खांबांची तपासणी करून संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात औंध, म्हाळुंगे रस्ता व सूस परिसरात विद्युत खांब बसविले जाणार आहेत. या खांबांसाठी ५ कोटी २८ लाख रुपयांचा खर्च लागणार असून तशी तरतूद करण्यात आली आहे. शहरातील जूने आणि खराब झालेलेच खांब काढले जात आहेत.

- श्रीनिवास कंदुल विद्युत विभाग प्रमुख, महापालिका.

शहरात गेल्या ५ वर्षात अनेक ठिकाणी नवीन लोखंडी खांब बसविण्यात आले आहेत. तरी सुध्दा महापालिकेच्या विदयुत विभागाकडून हा प्रकार केला जात असल्याने महापालिकेची तिजोरी लुटणारा तर हा शॉक नाही ना अशी शंका येत आहे. शहरासह उपनगर भागात आणि आता समाविष्ट गावांमध्ये अनेक ठिकाणी विद्युत खांबांची आवश्यकता आहे. मात्र जिथे गरज नसताना तसेच नवीन आणि चांगले खांब असताना ते काढता त्याच्या शेजारी "शॉक प्रूफ'' खांब बसविण्यात येत आहेत. त्यामुळे या प्रकाराला आमचा विरोध आहे. रास्ता पेठ, भवानी पेठे, शुक्रवार पेठे आणि बाजीराव रस्त्यावर गरज नसताना "शॉक प्रूफ'' विद्युत खांब बसविले जात आहेत.

 - विशाल धनवडे, माजी नगरसेवक, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना.  

पथदिव्यांची खांबांची सद्यस्थिती...

-  शहरातील पथदिव्यांच्या खांबांची संख्या - एक लाख ३० हजार

-  महापालिकेने घेतलेले "एफआरपी' विद्युत खांब - अडीच हजार

-  पहिल्या टप्प्यात बसविण्यात येणारे "एफआरपी' खांब - एक हजार

-  पथदिव्यांच्या खांबातील वीजेचा धक्का बसून झालेले मृत्यू - दोन

"एफआरपी'  खांबाला नाही "अर्थिंग ची आवश्यकता

 सध्या बसविण्यात आलेल्या खांबांना अर्थिंग देण्याची आवश्यकता भासते. या कामासाठी महापालिकेला दरवर्षी पावसाळ्यापूर्वी विद्युत खांब व अर्थिंगची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी १० ते १५ लाख रुपयांचा खर्च करावा लागत होता. त्यामुळे विजेचा धक्का बसण्याच्या घटनांवर नियंत्रण आणणे शक्य होते. मात्र आता "एफआरपी' खांबाला अर्थिंगची गरज नसल्याने केवळ अर्थिंगवर दरवर्षी होणारा १० ते १५ लाख रुपयांच्या खर्चात बचत होणार असल्याचे विद्युत विभागाने सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest