...तरीही राहते भाड्याच्या घरात

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन दिवाळीत ‘भूल भुलैय्या ३’ या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला असून विद्या पुन्हा मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

File Photo

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन दिवाळीत ‘भूल भुलैय्या ३’ या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला असून विद्या पुन्हा मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. २००७ साली आलेल्या ‘भूल भुलैय्या’ या सिनेमात विद्या अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिकेत झळकली होती. २०१२ मध्ये आलेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या सिनेमाने विद्याला मोठे यश मिळाले होते. 

त्यानंतर आलेल्या ‘कहानी’ सिनेमातील सशक्त अभिनयाने विद्या पुन्हा चर्चेत आली. याच सिनेमाच्या यशानंतर, २०१२ मध्ये विद्याने प्रसिद्ध निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांच्याशी लग्न केले. मात्र लग्नाच्या १२ वर्षांनंतरविद्या आजही भाड्याच्या घरातच राहते.

विद्या बालन म्हणाली की जेव्हा तिने सिद्धार्थ रॉय कपूरशी लग्न केले, त्यावेळी ती घर शोधत होती. जवळपास २५ घरे पाहूनही, तिला आणि सिद्धार्थला त्यांना दोघांना पसंत पडेल असे घर मिळाले नाही. नंतर त्यांना एक घर मिळाले, जे दोघांनाही आवडले, पण ते भाड्याचे होते.  घर खरेदी करण्याचा विचार डोक्यात ठेवून विद्या आणि सिद्धार्थने बराच काळ घर शोधले, पण त्यांना काहीच आवडले नाही.

अखेर त्यांनी भाड्याचे घर घेण्याचा निर्णय घेतला. गर्दीच्या शहरात जवळ बाग असणारे आणि समुद्र खिडकीतून दिसावा असे घर मिळणे कठीण आहे, त्यामुळे आम्ही भाड्याचे घर घेतले आणि हो, आमच्या घरमालकाला चांगले पैसे मिळत आहेत, असेही तिने हसत हसत सांगितले.  विद्या बालन अनेकदा आपल्या घरात रील बनवून सोशल मीडियावर शेअर करते. मात्र, त्या रील्समध्ये दिसणारे घर हे तिचे स्वतःचे नसून भाड्याचे आहे. विद्या बालनने अजूनपर्यंत स्वतःचे घर खरेदी केलेले नाही, पण आता ती घर घेण्याबाबत विचार करत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story