पश्चाताप नाही...; ब्रेकअपनंतर मलायका पहिल्यांदाच म्हणाली...जे झाले त्याबद्दल...

बाॅलिवूडमधील हाॅट कपलपैकी एक असलेल्या मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप काही काळापूर्वी झाले. मलायका पहिल्यांदाच याबद्दल बोलली. ‘‘जे झाले त्याबद्दल मला कोणताही पश्चाताप नाही.

Bollywood,Breakup, Malaika Arora ,No regrets,Arjun Kapoor,broke up,hottest couples

File Photo

बाॅलिवूडमधील हाॅट कपलपैकी एक असलेल्या मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप काही काळापूर्वी झाले. मलायका पहिल्यांदाच याबद्दल बोलली. ‘‘जे झाले त्याबद्दल मला कोणताही पश्चाताप नाही.मी माझे आयुष्य आपल्या पद्धतीने जगत आहे,’’ असे ती म्हणाली.

मलायका प्रथमच वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलली. ‘‘आयुष्यात मी जे काही निवडले, त्यामुळे माझ्या आयुष्याला आकार मिळाला आहे.  मी कोणतीही खंत न ठेवता जगत आहे. मी भाग्यवान समजते की गोष्टी जशा होत्या तशा उलगडत आहेत. माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात मी केलेल्या प्रत्येक निवडीने माझ्या आयुष्याला आकार दिला आहे यावर माझा विश्वास आहे. यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते,’’ असे मलायका म्हणाली

मलायका आणि अर्जुन यांचे नोव्हेंबर २०२३ मध्येच ब्रेकअप झाले होते. दोघांपैकी एकाला लग्न करून सेटल व्हायचे होते, तर दुसऱ्याला त्यासाठी वेळ हवा होता, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. हेच कारण त्यांच्यात फूट पडण्याचे कारण ठरले. मलायकाने अर्जुन आणि त्याच्या नातेवाइकांना इंस्टाग्रामवरून अनफॉलो केल्यावर त्यांच्या ब्रेकअपची बातमी चर्चेत आली. दोघे २०१६ पासून रिलेशनशिपमध्ये होते. या जोडप्याने वाढदिवसाच्या पोस्टद्वारे त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. 

मलायकाचे सावत्र वडील अनिल मेहता यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. या दु:खाच्या वेळी अर्जुन मलायकाला साथ देण्यासाठी आला होता. तो अनिल मेहता यांच्या प्रार्थना सभेतही दिसला होता.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story