रणसंग्राम २०२४ : ‘अडीच वर्षांनी दोन्ही पक्ष फोडून पुन्हा आलो’

२०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईनचा नारा दिला होता. वादामुळे महायुतीचं सरकार स्थापन झाले नाही. मी पुन्हा येईन या घोषणेवरून डिवचले गेलेल्या फडणवीस यांनी आता चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Devendra Fadanvis

संग्रहित छायाचित्र

फडणवीसांची फोडाफोडीची जाहीर कबुली

२०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मी पुन्हा येईनचा नारा दिला होता. वादामुळे महायुतीचं सरकार स्थापन झाले नाही. मी पुन्हा येईन या घोषणेवरून डिवचले गेलेल्या फडणवीस यांनी आता चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत एका परिसंवादात बोलताना ते म्हणाले की, सत्तेसाठी उद्धव यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं. आम्ही निवडून आलो. पण सरकार स्थापन झालं नाही. त्यामुळे आम्हाला काहीजण अहंकारी म्हणाले. हे तर राजकारणात सुरूच राहते. मी म्हटलं होतं की मी पुन्हा येईन. त्याला अडीच वर्षे लागली. परंतु, अडीच वर्षांनी आलो तर असा आलो की दोन्ही पक्ष फोडून आलो. (Lok Sabha Election 2024)

फोडाफोडीचे महामेरू

फडणवीसांचा व्हीडीओ शेअर करत विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, राज्यातील पक्ष आणि कुटुंब फोडाफोडीचे महामेरू कोण आहेत याबाबत लोकांमध्ये चर्चा होती. आज खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच त्याची कबुली दिल्याने लोकांमधील चर्चेवर शिक्कामोर्तब झालं. फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती राबवणाऱ्या भाजपाला राज्यातील स्वाभिमानी जनताच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest