Advertisement

BCB | बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या सहा संचालकांचा राजीनामा, अंतर्गत मतभेदामुळे मोठी उलथापालथ…

ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डामध्ये सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. शनिवारी बोर्डाच्या आणखी चार संचालकांनी एकाच वेळी राजीनामा दिला. गुरुवारीही (दि. २) दोन सदस्यांनी आपले पद सोडले होते. बैठकीनंतर सानियान तनीम, मेहराब आलम, फैयाजुर रहमान आणि मंजूरुल आलम यांनी आपला राजीनामा दिला. यापूर्वी यासिर मोहम्मद आणि फैसल आशिक यांनीही पद सोडले होते. आतापर्यंत सहा संचालकांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डाची साथ सोडली आहे. आणखी काही लोक पद सोडण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे.

बोर्ड अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी म्हटले आहे की, ‘‘सर्वजण जरी गेले तरी मी कुठेही जाणार नाही.’’ मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका आठवड्याच्या आत बांगलादेश क्रिकेट बोर्डाची नवी कमिटी बरखास्त होऊ शकते. बोर्डाने लिटन दासला २०२८ पर्यंत एकदिवसीय संघाचा आणि मेहदी हसनला २०२७ पर्यंत टी-२० संघाचा कर्णधार म्हणून कायम ठेवले आहे.

बोर्डाच्या मागील निवडणुकीवरून बराच वाद सुरू आहे. आता नॅशनल स्पोर्ट्स कौन्सिल याची चौकशी करत आहे. या चौकशीतून आणि मीडियाच्या प्रश्नांपासून वाचण्यासाठी अध्यक्ष बैठकीनंतर पत्रकार परिषदेला आले नाहीत, असे मानले जात आहे. यापूर्वीही काही मोठ्या अधिकाऱ्यांनी ‘खासगी कारणां’चे कारण देत राजीनामे दिले होते, परंतु खरी कारणे बोर्डातील अंतर्गत कलह असल्याचे मानले जात आहे.

‘बाहेरील लोक’ काम करू देत नाहीत…

अमिनुल इस्लाम बुलबुल माध्यमांसमोर आले नाहीत. पण एका टीव्ही चॅनलशी बोलताना त्यांनी आपले दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, “मी शेवटच्या दिवसापर्यंत माझी खुर्ची सांभाळेन. आमची टीम चांगली आणि प्रामाणिक आहे, मी त्यांच्यासोबत मिळून देशाच्या क्रिकेटची सेवा करू इच्छितो.”

अमिनुल थेट आरोप केला की, काही बाहेरील शक्ती त्यांना मोकळेपणाने काम करू देत नाहीत. बुलबुल यांच्या मते, “आम्हाला एक दिवसही स्वातंत्र्याने काम करू दिले नाही. बाहेरून सतत हस्तक्षेप होत आहे, ज्यामुळे आमच्या क्रिकेटची गती थांबली आहे.”

लिटन दासच एकदिवसीय कर्णधार

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने लिटन दासला २०२८ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत मेहदी हसन मिराजला २०२७ च्या टी-२० विश्वचषकापर्यंत कर्णधार म्हणून कायम ठेवले आहे. लिटन दासकडे एकदिवसीय संघाचे नेतृत्व देऊ नये, असे विरोधकांचे मत आहे. मात्र, बोर्ड आपल्या मतावर ठाम आहे. बोर्डाचे मत आहे की, दीर्घकाळ जबाबदारी दिल्याने दोन्ही कर्णधार त्यांच्या संघाला चांगल्या प्रकारे तयार करू शकतील. बोर्डाने माजी दिग्गज मोहम्मद रफीकला एका वर्षासाठी फिरकी गोलंदाजी सल्लागार बनवले आहे.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

PMC Pune | पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ, प्रदूषण रोखण्यात महापालिका अपयशी; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली नोटीस...

Next Post

PCMC | पवनेचे पात्र की खेळांचे मैदान? चिंचवड येथे मातीचा भराव घातल्याने नदीपात्र झाले अरूंद....