Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांनी सांगितले वेगळेच रामायण, भाजपने केला सनातनचा अपमान केल्याचा दावा

आता दिल्ली निवडणुकीत हा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. यावरूण आता भाजप आक्रमक झाला असून भाजपने अरविंद केजरीवाल यांच्या या वक्तव्यामुळेरामायणाबद्दलचे म्हणटले आहे. केजरीवाल सनातनची खिल्ली उडवत आहेत, असा आरोपही भाजपने केला आहे. एवढेच नाही तर भाजपने केजरीवाल यांना निवडणूकीपुरतेच हिंदू म्हणून संबोधले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Tue, 21 Jan 2025
  • 01:02 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहीत छायाचित्र

नवी दिल्ली:  रावणाने सोन्याच्या हरणाचे रूप धारण केले होते, असे वक्तव्य आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केल्यानंतर आता  दिल्ली निवडणुकीत हा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. यावरूण आता भाजप आक्रमक झाला  असून भाजपने अरविंद केजरीवाल यांच्या या वक्तव्यामुळेरामायणाबद्दलचे म्हणटले आहे. केजरीवाल सनातनची खिल्ली उडवत आहेत,  असा आरोपही भाजपने केला आहे. एवढेच नाही तर भाजपने केजरीवाल यांना निवडणूकीपुरतेच हिंदू म्हणून संबोधले आहे.

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी एका निवडणूक सभेत सांगितले की, एके दिवशी रामचंद्र अन्नाची व्यवस्था करण्यासाठी जंगलात गेले. सीतेला त्याच्या झोपडीत सोडले. त्यांनी लक्ष्मणाला सांगितले की तू सीतामैय्याचे रक्षण करशील. दरम्यान, रावण सुवर्णमृगाच्या रूपात आला. सीते मातेने लक्ष्मणला सांगितले की तिला हे हरण हवे आहे. श्रीरामांच्या शब्दांचा हवाला देऊन लक्ष्मणाने जाण्यास नकार दिला. भगवान राम म्हणाले आहेत की मला तुमचे रक्षण करावे लागेल. सीता म्हणाली नाही, मी तुला हरण पकडण्याचा आदेश देते. लक्ष्मणाकडे पर्याय नव्हता. लक्ष्मण निघून गेला आणि रावणाने आपला वेश बदलला आणि सीतामैय्याचे अपहरण केले आणि निघून गेला.

Share this story

Latest