Akhilesh Yadav : मोदी गेल्या वेळी ते त्यांच्यासोबत एक हिरा घेऊन गेले होते, यावेळी कृपया..;मोदींच्या परदेश दौऱ्यावर अखिलेश यादव यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वेळी ते त्यांच्यासोबत एक हिरा घेऊन गेले होते. यावेळी कृपया सोन्याची साखळी घेऊन जावे. कदाचित ती साखळी पाहिल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या साखळीची आठवण येईल,असा टोला खासदार अखिलेश यादव यांनी लगावला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Tue, 11 Feb 2025
  • 05:58 pm
pune mirror

संग्रहीत छायाचित्र

नवी दिल्ली:  पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वेळी ते त्यांच्यासोबत एक हिरा घेऊन गेले होते. यावेळी कृपया सोन्याची साखळी घेऊन जावे. कदाचित ती साखळी पाहिल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या साखळीची आठवण येईल,असा टोला खासदार अखिलेश यादव यांनी लगावला आहे. अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका केली आहे.

 खासदार अखिलेश यादव म्हणाले की, ‘शक्य असेल तर अमेरिकेतून काही मुले आणि महिलांना विमानात घेऊन या, जर तुमच्यासोबत नसेल तर दुसऱ्या कोणासोबत तरी घेऊन या.किमान काही लोकांना सन्मानाने परतण्याचा अधिकार आहे. स्थलांतरितांबाबत अमेरिकेने बदललेल्या धोरणांचा सर्वाधिक फटका गुजरातमधील लोकांना बसला आहे.” दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी कुंभमेळ्याच्या व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले, ज्यावर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आक्षेप घेतला, त्यानंतर सभागृहात गोंधळ झाला.

Share this story

Latest