कधीही व्हायचे नव्हते महामंडलेश्वर

नव्वदच्या दशकात जेव्हा ममता कुलकर्णी चित्रपटसृष्टीत आली तेव्हा चित्रपटसृष्टीत प्रवेश करताच ती चर्चेचा विषय बनली. आता ममता कुलकर्णीला अध्यात्माच्या जगात स्थान मिळाले असले तरी वादांनी तिला सोडलेले नाही.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

नव्वदच्या दशकात जेव्हा ममता कुलकर्णी चित्रपटसृष्टीत आली तेव्हा चित्रपटसृष्टीत प्रवेश करताच ती चर्चेचा विषय बनली. आता ममता कुलकर्णीला अध्यात्माच्या जगात स्थान मिळाले असले तरी वादांनी तिला सोडलेले नाही. २०२५ च्या महाकुंभ दरम्यान, किन्नर आखाड्याने अभिनेत्रीला महामंडलेश्वर ही पदवी दिली, ती ७ दिवस महामंडलेश्वर राहिली, परंतु अनेक बाबांच्या निषेधानंतर तिला या पदावरून काढून टाकण्यात आले. नुकत्याच एका टीव्ही शोमध्ये दिसलेल्या ममता कुलकर्णीने साध्वी बनण्याच्या तिच्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितले की, गेल्या २३ वर्षांत तिने एकही अडल्ट चित्रपट पाहिलेला नाही. पण नवरात्रीत '२ पेग' घेण्याची कहाणीही अभिनेत्रीने स्वतः सांगितली होती.

जेव्हा ममता कुलकर्णीला विचारण्यात आले की, 'मी ऐकलं आहे की तु नवरात्रीत उपवास करायची आणि रात्री ताज हॉटेलमध्ये दोन पेग घ्यायची.' हा प्रश्न ऐकून ममता कुलकर्णीने तिच्या साधनेबद्दल सांगितलं. ममता कुलकर्णी म्हणाली, 'मी जेव्हा बॉलिवूडमध्ये होते तेव्हा माझे गुरु १९९७ मध्ये माझ्या आयुष्यात आले.' मग होस्टने प्रश्न विचारला, 'तु चित्रपटांमध्ये असतानाही नवरात्रीत ध्यान करायची, उपवास करायची असे ऐकले आहे, पण रात्री तु ताजमध्ये जायची आणि स्कॉचचे दोन पेग घ्यायची?' यावर ममता कुलकर्णी म्हणाली, 'बॉलिवुडमध्ये माझे आयुष्य असे होते की जेव्हा जेव्हा मी शूटिंगसाठी जायचे तेव्हा माझ्याकडे तीन बॅगा असायच्या. एक माझ्या कपड्यांची आहे, दुसरी माझ्या मंदिराची आहे. माझ्या खोलीत टेबलावर माझे मंदिर असायचे. मी पूजा केल्यानंतरच शूटिंगला जायचे.'हे सर्व १९९६-९७ मध्ये घडले. २ वर्षांपर्यंत, माझ्या गुरूंनी पाहिलं की हे बॉलिवूड मला या मार्गावर जास्त काळ राहू देणार नाही. म्हणूनच त्याने माझ्यासाठी असं तपश्चर्येचं ठिकाण निवडलं की १२ वर्षे कोणीही मला भेटू शकणार नाही.' असं ममताने पुढे सांगितलं.दरम्यान, ममता कुलकर्णीच्या हकालपट्टीचे कारण किन्नर आखाड्याचे संस्थापक अजय दास आणि आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यातील खोल वादाशी संबंधित आहे.

अजय दास यांनी त्रिपाठी यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची धमकी दिली, तर त्रिपाठी यांनी हा दावा फेटाळून लावला आणि म्हणाले की दास यांना असा अधिकार नाही. यामुळे आणखी वाद निर्माण झाला, ज्यामुळे त्रिपाठी आणि कुलकर्णी दोघांनाही त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले. दुसरीकडे, ममता कुलकर्णी म्हणते की तिला कधीही महामंडलेश्वर व्हायचे नव्हते, परंतु किन्नर आखाड्याचे आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या दबावाखाली तिने महामंडलेश्वर होण्यास होकार दिला.

Share this story