Breaking | बॉलिवूडचा 'भारत' काळाच्या पडद्याआड; प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन....

मनोज कुमार विशेषतः त्यांच्या देशभक्तिपर चित्रपटांसाठी ओळखले जायचे. त्यांना भरत कुमार म्हणूनही ओळखले जात असे. उपकार, पूरब-पश्चिम, क्रांती, रोटी-कपडा और मकान हे त्यांचे यशस्वी चित्रपट होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 4 Apr 2025
  • 08:14 am
 Manoj Kumar passes away

Actor-director Manoj Kumar passes away

Actor-director Manoj Kumar passes away | प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचं आज सकाळी मुंबईतील कोकिलाबेन इस्पितळात निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते.  त्यांनी अभिनय केलेले  देशभक्तिपर अनेक चित्रपट गाजले, ज्यामुळे त्यांना भारत कुमार असंही ओळखलं जात असे. 

दिग्गज बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांच्यावर काही दिवसांपासून मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत्यूशी झुंज त्यांची अपयशी ठरली असून त्यांचं निधन झालं आहे.

मनोज कुमार विशेषतः त्यांच्या देशभक्तिपर चित्रपटांसाठी ओळखले जायचे. त्यांना भरत कुमार म्हणूनही ओळखले जात असे. उपकार, पूरब-पश्चिम, क्रांती, रोटी-कपडा और मकान हे त्यांचे यशस्वी चित्रपट होते.

प्रदीर्घ काळापासून मनोज कुमार आजारी होते. प्रकृती अस्वास्थामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. मनोज कुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीत 'भरत कुमार' म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीसह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.

मनोज कुमार यांना 7 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. पहिला फिल्मफेअर पुरस्कार १९६८ मध्ये 'उपकार' चित्रपटासाठी मिळाला. 'उपकार' ला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट संवाद असे चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. १९९२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१६ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Share this story