Hindi Language Controversy: ज्यांच्याकडे काही उद्योग नाही त्यांचा हिंदी भाषेला विरोध; उपमुख्यमंत्री अजित पवारांची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी भाषा की मराठी भाषा यावर मोठा राजकीय वाद निर्माण झाल्याचं दिसत आहे. राज्य शालेय अभ्यासक्रम आराकडा २०२४ नुसार आता महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी व इंग्रजीसोबतच हिंदीही सक्तीची करण्यात आली आहे

pune mirror, civic mirror, marathi news, breaking news, pune news, pune times mirror

सग्रहीत छायाचित्र

 गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी भाषा की मराठी भाषा यावर मोठा राजकीय वाद निर्माण झाल्याचं दिसत आहे. राज्य शालेय अभ्यासक्रम आराकडा २०२४ नुसार आता महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी व इंग्रजीसोबतच हिंदीही सक्तीची करण्यात आली आहे. तिसरी भाषा म्हणून विद्यार्थ्यांना हिंदी शिकावी लागणार आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गदारोळ सुरू झाला आहे. राज ठाकरेंनी याचा निषेध करणारी सविस्तर पोस्ट केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या वादावर भाष्य केलं आहे.

 

-काय म्हणाले अजित पवार?

ज्यांना काही उद्योग शिल्लक नाही ते हिंदी भाषेचा विरोध करत आहे. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, मराठी आपली ही मातृभाषा आहे. तसेच इंग्रजी ही जागीतक भाषा आहे. तीन्ही भाषा आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. त्यामुळें हिंदीला विरोध करण्याच काही कारण नाही, कारण की मराठी आपली मातृभाषा आहे. आणि काही महिन्यांपूर्वी  केंद्र सरकारने मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, त्यामुळे ज्यांच्याकडे काही उद्योग नाही ते हिंदी भाषेला विरोध करत आहेत अशी टीका  अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर केली आहे.. 

नाशिक दंगल प्रकरणात आम्ही कुठल्या पार्टीचा कार्यकर्ता म्हणून केस दाखल करत नाही, जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करत आहोत. कुणालाही सोडले जाणार नाही, असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे. 

बीडचे निलंबित पीएसआय अभिजीत कासले यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाईल आणि त्याच्या नंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

बीडमध्ये ज्या महिलेलाल अमानुष  मारहाण करण्यात आली त्याचे फोटो मला काल रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत.  जे दोषी असतील त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. 

Share this story

Latest