भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे एक ट्विट चर्चेत आलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने काल(दि. 16 एप्रिल) नाशिक येथे घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये एआयच्या मदतीने बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकवले. या भाषणात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बाळासाहेबांच्या आवाजात टीका करण्यात आली होती. दरम्यान, ट्विट करत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.
आपला आवाज कुणी ऐकत नाही, म्हणून आपले विचार हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त उबाठासारखा गटच करु शकतो. अशी टीका करत बावनकुळे यांनी 'बाळासाहेब असते तर त्यांच्या बुडावर लाथच घातली असती', अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे.
बावनकुळेंचे नेमकं ट्विट काय?
धिक्कार...!
आपला आवाज कुणी ऐकत नाही, म्हणून आपले विचार हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त उबाठासारखा गटच करु शकतो.
मला खात्री आहे, आज ज्यांनी
- बाळासाहेबांना जनाब ठरविले,
- ज्यांनी टिपू सुलतानाचे नावं उद्यानांना दिली,
- वीर सावरकरांचा सकाळी अपमान करणार्या राहुल गांधींच्या गळ्यात सायंकाळी गळे घातले...
- वक्फच्या विरोधात मतदान केले,
- राममंदिराला सातत्याने विरोध करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसले
- 370 रद्द करणार्याला विरोध करणार्यांना पाठिंबा दिला,
- वाझेसारख्यांकडून वसुली करवून घेतली,
- डेडबॉगी बॅगमध्येही घोटाळे केले,
- कोविड काळात खिचडीत घोटाळे केले,
- मराठी माणसांच्या घरात घोटाळे करुन गल्ले भरले,
त्यांच्या बुडावर बाळासाहेबांनी लाथच घातली असती....
ज्या गोष्टींसाठी वंदनीय बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, किमान त्याच्या विरोधात बाळासाहेबांचा आवाज वापरु नये. त्यांचे विचार बुडविलात. किमान मृत्यूनंतर त्यांच्या आवाजाचा असा गैरवापर करु नका.
धिक्कार...!
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) April 16, 2025
आपला आवाज कुणी ऐकत नाही, म्हणून आपले विचार हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त उबाठासारखा गटच करु शकतो.
मला खात्री आहे, आज ज्यांनी
- बाळासाहेबांना जनाब ठरविले,
- ज्यांनी टिपू सुलतानाचे नावं उद्यानांना…
बाळासाहेबांच्या भाषणात नेमकं आहे तरी काय?
एआयच्या मदतीने घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये बाळासाहेबांच्या आवाजातील भाषण ऐकवण्यात आले. या भाषणात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. 'मोदी म्हटले असते असते नासिक और मेरा पुराना नाता है, मैने सावरकरजीके साथ मिलकर जॅकसन का वध किया मेरा ही प्लॅनिंग था. असे जातील तेथे गंडवतील. भाजपला कोण ओळखत होते. कोणी जवळ करत नव्हते. आम्ही यांना जवळ केले. ही नाती जपणारी माणसं नाही. कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे.'