Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये तीन उड्डाणपूल धोकादायक, चिंचवड पुलावरून अवजड वाहतुकीला बंदी

महानगरपालिकेचा पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपूल आणि चिंचवड स्टेशनचा रेल्वे उड्डाणपूल धोकादायक स्थितीत असून त्या पुलाची महानगरपालिकेकडून डागडूजी करुन सुरु केले आहेत. तर ब्रिटीश कालीन दापोडीतील हॅरिस ब्रिज देखील बंद करण्याची स्थिती होती. त्यावर देखील देखभाल दुरुस्ती करुन सुरु आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील तीन पुलाची स्थिती धोकादायक होती.

pune mirror, civic mirror, marathi news, breaking news, pune news, pune times mirror

महानगरपालिकेचा पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपूल आणि चिंचवड स्टेशनचा रेल्वे उड्डाणपूल धोकादायक स्थितीत असून त्या पुलाची महानगरपालिकेकडून डागडूजी करुन सुरु केले आहेत. तर ब्रिटीश कालीन दापोडीतील हॅरिस ब्रिज देखील बंद करण्याची स्थिती होती. त्यावर देखील देखभाल दुरुस्ती करुन सुरु आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील तीन पुलाची स्थिती धोकादायक होती. परंतू, त्यावर महानगरपालिकेकडून करोडो रुपये खर्च करुन दुरुस्ती करत वाहतूकीस सुरु केले आहे. तर चिंचवड स्टेशनचा उड्डाणपूल हा अवजड वाहतूकीस बंद करण्यात आलेला आहे.  

पिंपरी गावाला जोडणा-या इंदिरा गांधी उड्डाणपूल आणि चिंचवड स्टेशन हे दोन्ही रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल हे कालबाह्य झाले आहेत. महापालिकेने या दोन्ही उड्डाणपूलाची तात्पुरती दुरुस्ती देखील केली होती. तरीही हे दोन्ही उड्डाणपूल धोकादायक बनले असून त्या पुलाचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे हे दोन्ही उड्डाणपूल तात्काळ पाडण्यात यावे, जेणे करुन भविष्यातील अपघात टाळण्यात येईल, असे पत्र रेल्वे विभागाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला देण्यात आले आहे.

 पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरीगाव, मार्केट येथील इंदिरा गांधी उड्डाणपुल खूप जीर्ण झाला आहे. तसेच, चिंचवड स्टेशन येथील पुणे-मुंबई जुन्या महामार्ग व चिंचवड गावाला जोडणार्‍या उड्डाणपुल देखील कालबाह्य झाला आहे. रेल्वे मार्गावरील दोन्ही उड्डाणपूल तात्काळ पाडण्यात यावेत, याकरिता रेल्वे विभागाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला पत्र देवून पाठपुरावा सुरु आहे. परंतू, हे उड्डाणपूल पाडल्यास पिंपरी आणि चिंचवड गावाकडे जाणारी वाहतूक कोणत्या मार्गाने सोडायची, असा प्रश्न महापालिकेच्या अधिका-यांना पडला आहे.

पुणे-मुंबई जुन्या महामार्ग आणि पिंपरी गावाास जोडणारा पुणे-लोणावळा लोहमार्गावरील पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाण पुल हा शहरातील सर्वांत पहिला पुल आहे. या उड्डाण पुलाचे आयुष्य संपले आहे. सगळे बांधकाम धोकादायक झाले आहे. तो पुल वाहतुकीस बंद करा. पुल पाडून टाका, असे पत्र रेल्वे विभागाने महापालिकेस तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या कार्यकाळात पाठविले होते.

शहरातील दोन भागांना जोडणारा हा महत्वाचा पुल असल्याने महापालिकेने पुलाचे स्ट्रॅक्टर ऑडिट केले. त्यानंतर त्यांचे मजबुतीकरण करण्यात आले. हे काम सुमारे 2 ते 3 वर्षे सुरू होते. त्यावर उड्डाणपुल दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आला. त्यानंतर पिंपरीच्या उड्डाणपूलाचे मजबूतीकरण करण्यात आले आहे.

तसेच, शहरातील चिंचवड स्टेशन येथील लोहमार्गावरील उड्डाण पुलाच्या बांधकामास 47 वर्षे झाले आहेत. ते बांधकाम धोकादायक झाले असून, तो पुल पाडा, असे पत्र रेल्वेने महापालिकेस नुकतेच पाठविले आहे. या पुलाशेजारी महापालिकेने सुमारे 15 वर्षांपूर्वी समांतर पुल बांधला आहे. जुना पुल तोडावा लागणार असल्याने येथील वाहतुक समस्या अधिक गंभीर होणार आहे. हे दोन्ही पुल महापालिका पाडणार की, नव्याने पुन्हा तयार करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

हॅरिस ब्रिज ब्रिटीशकालीन..

पुणे आणि पिंपरी-चिंचवड जोडणारा हॅरिस ब्रीज हा ब्रिटिशकालीन आहे. पुलाबाबत दक्षता घेण्यात आलेली आहे. या पुलास समांतर पूल उभारण्यात आलेला असून हे काम दोन्ही महापालिकेकडून केले आहे. हॅरिस ब्रिज ब्रिटिशकालीन आहे. या पुलाबाबत योग्य त्या दक्षता घेण्यात आलेल्या आहे. या पुलाचे पुणे महापालिकेने २०१३ मध्ये स्ट्रक्चरल आॅडिट केले होते. कुंडमळा पुलाच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. हॅरिस ब्रीजचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वच पुलाचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

शहरातील नदीवरील पुलांप्रमाणेच आता नाले, ओढे, तसेच कालव्यांवर बांधण्यात आलेल्या पुलांचेही स्थापत्य लेखापरीक्षण (स्ट्रक्टरल ऑडिट) करण्यात येणार आहे. शहरातून वाहणाऱ्या नदीवर जागोजागी पूल बांधण्यात आलेले आहेत. या पुलांवरून वाहतूक होत असल्याने ते वापरण्यास योग्य आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी महापालिकेने या पुलांचे स्थापत्य लेखापरीक्षण करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यानुसार कामही सुरू करण्यात आले आहे. याच धर्तीवर आता शहरातील ओढे-नाले, तसेच कालव्यांवरील पुलांचेही स्थापत्य लेखापरीक्षण करण्याचे महापालिकेने ठरवले आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी नवीन पूल उभारणार

जुन्या पुलावरून बस वाहतूक बंद असल्यामुळे चिंचवडकडे जाणाऱ्या बसेस आणि अवजड वाहने दळवी नगर मार्गे वळसा घेऊन जात आहेत. सदर पुलावरून जड वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टिने रेल्वे विभागाशी सल्लामसलत करुन नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात आली. रेल्वे विभागाने देखील सदर पुलाबाबत महानगरपालिकेस अभिप्राय सादर केला होता. या अभिप्रायामध्ये रेल्वे विभागाने सदरचा पूल जीर्ण झाला असल्याने व सुरक्षिततेच्या दृष्टिने महानगरपालिकेने नवीन पूल बांधवा, असे सुचीत केले होते.

अखेर समितीचा अहवाल, रेल्वे विभागाचा पूल नवीन बांधण्याचा अहवाल, लोकप्रतिनिधी यांची पुलावरील जड वाहतुक चालू करण्याची मागणी या सर्व बाबींचा विचार करता हा जुना पूल पाडुन तेथे नवीन पूल बांधण्यात येणार आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी  नविन पुल बांधणे व पुलाचे कामासाठी सल्लागार नेमण्याचे कामास मंजुरी दिली आहे.

Share this story

Latest